Posts

उंडाळे येथे 50% सवलतीच्या दरात इलेक्ट्रिक स्कूटर, वॉटर प्युरिफायर, सायकल या वस्तूंचे वितरण.

Image
उंडाळे येथे  50% सवलतीच्या दरात इलेक्ट्रिक स्कूटर, वॉटर प्युरिफायर, सायकल या वस्तूंचे वितरण. पंकज पाटील यांचे कार्य कौतुकास्पद. ____मा. आनंदराव पाटील.  उंडाळे - प्रतिनिधी. उंडाळे ता.कराड येथे, भाजपा सोशल मीडिया सातारा जिल्हा उपाध्यक्ष मा.पंकज पाटील यांच्या वतीने  जनतेसाठी पहिल्यांदाच 50% सवलतीच्या दरात इलेक्ट्रिक स्कुटर, वाटर फिल्टर, रेंजर सायकल या वस्तूंचे वितरण स्टॉलचे उदघाटन विधान परिषद मा.आमदार मा.श्री.आनंदरावजी पाटील (नाना) व य.मो.कृष्णा सहकारी साखर कारखाना संचालक मा.श्री.श्रीरंग देसाई (तात्या) यांच्या हस्ते करण्यात आले. पंकज पाटील यांचे कार्य कौतुकास्पद यावेळी मा.आनंदराव पाटील (नाना) यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  "उंडाळे विभागामध्ये, आमदार डॉ.अतुलबाबा भोसले यांचे सामाजिक कार्य तळागाळात पोहचवण्याचे काम आणि समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचे काम, सर्व शासकीय योजना सर्वसामान्यान पर्यंत पोहचवून लाभ मिळवून देण्याचे काम आणि सवलतीच्या दरात 50% ऑफर देऊन शाळेतील विद्यार्थी, महिला, ग्रामस्थ यांना विविध वस्तू उपलब्ध करून देण्याचे काम मा.पंकज पाटील यांनी केले आहे. ते इत...

सवलतीच्या दरात इलेक्ट्रिक स्कुटर, वाटर फिल्टर, रेंजर सायकल वाटप.

Image
  सवलतीच्या दरात इलेक्ट्रिक स्कुटर, वाटर फिल्टर, रेंजर सायकल वाटप. उंडाळे- प्रतिनिधी. भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा.डॉ.अतुलबाबा भोसले यांच्या सहकार्याने, भाजपा सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष मा.पंकज पाटील यांच्या वतीने तमाम जनतेसाठी पहिल्यांदाच 50% सवलतीच्या दरात इलेक्ट्रिक स्कुटर, वाटर फिल्टर, रेंजर सायकल वाटप करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी लाभ घ्यावा. गुरुवार दि.20/11/2025 रोजी ठीक सायंकाळी 5 वाजता स्टॉलचे उदघाट्न करण्यात येणार आहे. आपण उपस्थित राहावे.ठिकाण - उंडाळे स्टॅंड, बँक ऑफ महाराष्ट्र शेजारी, उंडाळे. असे आवाहन भाजप सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष मा. पंकज पाटील यांनी केले आहे.

कोठा येथे साडी निर्मिती उद्योग उभारणार

Image
  कोठा येथे साडी निर्मिती उद्योग उभारणार -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मेळघाटातील रस्त्यासाठी मार्ग काढणार मदर डेअरीचे दोन दूध संकलन केंद्र सुरू करणार.  दि. 17 (जिमाका) : मेळघाटातील आदिवासींना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांचा आर्थिक विकास व्हावा यासाठी विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. कोठा येथील संपूर्ण बांबू केंद्रात बांबूपासून विविध वस्तू तयार करण्यात येत आहेत. येत्या काळात या ठिकाणी पाच कोटी रुपयांच्या कोसा साडी निर्मितीचा उद्योग उभारण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. धारणी तालुक्यातील कोठा येथे भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त आज कार्यक्रम पार पडला, यावेळी कांचन गडकरी, संपूर्ण बांबू केंद्राच्या अध्यक्ष डॉ. निरुपमा देशपांडे, योगेश बापट आदी उपस्थित होते.        श्री. गडकरी म्हणाले, आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यांचा विकास व्हावा, समाजात स्थान मिळावे, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. आदिवासींमध्ये कौशल्य असून त्यास प्रशिक्षणाची जोड देणे आवश्यक आहे. संप...

बी. आर.एस. पी. चे चेंबूर येथे आंदोलन

Image
  बी. आर.एस. पी. चे चेंबूर येथे आंदोलन. मुंबई- प्रतिनिधी. बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी ( BRSP ) संस्थापक अध्यक्ष ऍड डॉ सुरेश माने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुंबई प्रदेश अध्यक्ष दिपक चौगुले यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी चेंबूर विभागातील वॉर्ड क्रमांक 150 आणि 152 मधील नागरिकांच्या मूलभूत समस्या, शौचालय, वाढते प्रदूषण आणि मनपाच्या दुर्लक्षाबाबत एम वेस्ट मनपा कार्यालयावर घेराव आंदोलन आयोजित करण्यात आले.आंदोलन होण्यापूर्वीच सहाय्यक आयुक्त यांनी एक दिवस पूर्वी संपर्क करून BRSP प्रतिनिधींना भेटीसाठी निमंत्रित केले. त्या भेटीदरम्यान पक्षाच्या प्रतिनिधींनी वॉर्ड मधील विविध समस्या सविस्तरपणे मांडल्या. सहाय्यक आयुक्तांनी आपल्या अधिकारी वर्गांच्या उपस्थिती मधे सर्व मुद्दे ऐकून घेत काही ज्वलंत प्रश्न तातडीने मार्गी लावू तसेच इतर समस्या एक आठवड्याचा अवधी मध्ये सोडविण्याचे समाधानकारक आश्वासन दिले.महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या नियोजन बैठकीच्या पार्श्वभूमीवर, सहाय्यक आयुक्त कार्यालय यांच्या विनंतीनुसार घेराव आंदोलन तात्पुरते स्थगित कर...

“जिसकी जितनी संख्या भारी – उतनी उसकी हिस्सेदारी!”

Image
“जिसकी जितनी संख्या भारी – उतनी उसकी हिस्सेदारी!” ‘आदिवासी जनचेतना महासम्मेलन’ भव्यदिव्य आयोजन.   गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट :- जननायक बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आणि भारतीय संविधान अमृत महोत्सवानिमित्त भव्य आयोजन गडचिरोली येथे दिनांक  १५ - १६ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे.बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी, भारतीय आदिवासी परिषद आणि आदिवासी-दलित एकता परिषद  यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आदिवासी जनचेतना महासम्मेलन’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, हा दोन दिवसीय ऐतिहासिक सोहळा १५ व १६ नोव्हेंबर २०२५ रोजी वीर बाबुराव शेडमाके सभागृह परिसर, गडचिरोली येथे पार पडणार आहे.या महासम्मेलनाचे अध्यक्ष आणि प्रमुख मार्गदर्शक आहेत – ॲड. डॉ. सुरेश माने, संस्थापक अध्यक्ष, बी.आर.एस.पी. तसेच भारतीय आदिवासी परिषद व आदिवासी-दलित एकता परिषद यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.महात्मा फुले, बिरसा मुंडा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित सामाजिक समता, स्वाभिमान, राजकीय हक्क आणि सांस्कृतिक ओळख या विषयांवर व्यापक जनजागृती घडवून आणणे हा या महामेळाव्याचा हेतू आह...

विद्यार्थ्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी वक्तृत्व कला हेच प्रभावी साधन.

Image
  विद्यार्थ्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी वक्तृत्व कला हेच प्रभावी साधन____ प्राचार्य प्रो. डॉ.सतीश घाटगे. कराड  - प्रतिनिधी. 13 नोव्हेंबर 2025 श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे 59 व्या ए डी श्रॉफ स्मरणार्थ वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे होते. आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात ते म्हणाले, विद्यार्थ्यांच्यातं आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी वक्तृत्व कला हेच प्रभावी साधन आहे. महाविद्यालयीन जीवनात प्रत्येक विद्यार्थ्याने वक्तृत्व कलेची जोड जोपासली तर नक्कीच त्यांचे व्यक्तिमत्व भविष्यात फुलणार आहे. अशा स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याने विद्यार्थ्यांच्या सभाधिटपणा येतो. स्वतःचे विचार इतरांसमोर चांगल्या पद्धतीने कसे मांडावे. याचा अनुभव या स्पर्धेत भाग घेतल्याशिवाय येत नाही. अशा स्पर्धेतूनच महाराष्ट्र राज्याचे स्वर्गीय माजी उपमुख्यमंत्री गृहमंत्री नामदार आर. आर. पाटील यांच्यासारखे व्यक्तिमत्व घडले. नामदार लक्ष्मणराव ढोबळे, प्राचार्य शिवाजीराव भोसले, प्र...

इलेक्ट्रॉनिक माध्यमाव्दारे प्रसारित होणाऱ्या जाहिरातीचे प्रमाणन करणे अनिवार्य.

Image
  इलेक्ट्रॉनिक माध्यमाव्दारे प्रसारित होणाऱ्या जाहिरातीचे प्रमाणन करणे अनिवार्य. ___ जिल्हाधिकारी संतोष पाटील. सातारा, दि.12 : सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमाव्दारे प्रसारित करण्यात येणा-या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणूक विषयक सर्व जाहिरातीचे माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समिती कडून पूर्व प्रमाणन करून घेणे अनिवार्य आहे. समाज माध्यमांचा समावेश, इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या श्रेणीत करण्यात आल्याने त्यावर प्रसारित करण्यात येणाऱ्या जाहिरातींचेही प्रमानण अनिवार्य आहे, असे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी कळविले आहे.  पूर्व प्रमाणनाशिवाय अशा जाहीरातीचे प्रसारमाध्यामांना प्रसारण करता येणार नाही, निवडणूक विषयक जाहिरातीवर राजकीय पक्षाने खर्च केला असल्यास त्याचा समावेश पक्षाच्या तसेच उमेदवाराने खर्च केला असल्यास त्याचा समावेश निवडणूक उमदेवारच्या खर्चात होईल. एखाद्या व्यक्तीस किंवा मतदारास आपल्या वैयक्तिक सोशल मीडिया वरून राजकीय मत व्यक्त करण्यास साधारणतः कोणतेही बंधन नाही. मात्र ४नोव्हेंबर २०२५ पासून जिल्ह्यामध्ये ९ नगरपरिषदा व १ नगरपंचायत यांच्या सार्वत्रिक निवडणुकीची आचार संहिता लाग...