Posts

Showing posts from March, 2025

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमेटीची वार्षिक बैठक उत्साहात संपन्न.

Image
 डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमेटीची वार्षिक बैठक उत्साहात संपन्न.   अध्यक्षपदी राहुल भोसले यांची निवड. कराड - प्रतिनिधी.    भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमेटीची वार्षिक सर्वसाधारण बैठक माजी नगरसेवक आयु.शांताराम थोरवडे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार पेठ कराड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे उत्साहात पार पडली. प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास जयंती उत्सव कमेटीचे अध्यक्ष आयु. राहुल भोसले यांनी पुष्पहार अर्पण केला.तर सांस्कृतिक भवन येथे बुध्द वंदना घेऊन पुढील कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.  यावेळी मागील वर्षाचा अहवाल वाचन कमेटीचे सचिव संतोष बोलके यांनी केले यास सर्व संमतीने मान्यता देण्यात आली. व मागील वर्षाची कार्यकारिणी बरखास्त करून नवीन कार्यकारिणी निवडण्याबाबत चर्चा करण्यात आली. या चर्चेवेळी अध्यक्ष पदासाठी काही नांवे पुढे आल्याने काही काळ बैठकीत गोंधळ निर्माण झाला. काही वेळाने पुन्हा बैठक शांततेत पार पडली व मागील कार्यकारिणी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे सन 2025 ते 2026 च्या जयंती उत्सव कमेटीचे अध्यक्ष म...

डॉ. अतुलबाबा भोसले : जनसेवेचे एक आदर्श नेतृत्व.

Image
 डॉ. अतुलबाबा भोसले : जनसेवेचे एक आदर्श नेतृत्व. ब्युरो रिपोर्ट गोंडवाना न्यूज - (प्रि.वि. धुळप)  . कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले हे लोकसेवेसाठी समर्पित, निस्वार्थी आणि कृतिशील नेतृत्वाचे उत्तम उदाहरण आहेत. ‘बोले तैसा चाले’ या विचारसरणीवर ठाम असलेले डॉ. भोसले आपल्या कार्यामुळे लोकांमध्ये विश्वासार्हता निर्माण करतात. कोणतीही वेळ असो, आव्हान कितीही मोठे असो, त्यांनी नेहमीच लोकसेवेसाठी तत्पर राहण्याचे व्रत स्वीकारले आहे. उच्च शिक्षण घेतलेल्या डॉ. अतुलबाबांनी एम.बी.बी.एस. पदवी प्राप्त करून वैद्यकीय क्षेत्रात मोठे कार्य करता आले असते. मात्र, त्यांनी सामाजिक कार्य आणि जनतेच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेतले. कोणतीही समस्या तडीस नेईपर्यंत ते स्वस्थ बसत नाहीत, आणि म्हणूनच त्यांचे नेतृत्व नैतिकतेच्या भक्कम आधारावर उभे आहे. त्यांच्या कार्यशैलीमुळे त्यांची ओळख पारदर्शक, नैतिक आणि लोकाभिमुख नेते म्हणून झाली आहे. समाजाच्या सर्व स्तरांतील लोकांशी संपर्क ठेवत, त्यांच्या गरजा समजून घेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी ते दिवसरात्र कार्यरत असतात. डॉ. अतुलबाबांचे कुटुंब सहकार चळवळीशी नाते जोडले...

दलित महासंघ युवक जिल्हाध्यक्ष पदी प्रवीण बडेकर यांची निवड.

Image
  दलित महासंघ युवक जिल्हाध्यक्ष पदी प्रवीण बडेकर यांची निवड. कासेगाव - प्रतिनिधी.  वाळवा तालुक्यातील कासेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण उर्फ बापूराव बडेकर यांची डॉ.  उत्तम दादा मोहिते  प्रेरित   दलित महासंघ (मोहिते गट) युवक सांगली जिल्हाध्यक्ष पदी यांची निवड करण्यात आली. बापूराव बडेकर हे सामाजिक राजकीय,शैक्षणिक,सांस्कृतिक व समाजासाठी असणारी तळमळ व आक्रमकपणा व अन्यायाविरुद्ध लढणारे कार्यकर्ते. सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांना दलित महासंघ मोहिते गट संस्थापक अध्यक्ष डॉ. उत्तम दादा मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली यांची ही निवड करण्यात आली. यावेळी सुधीर कांबळे, भास्कर चव्हाण,चैतन्य मदने, अमित अवताडे उमेश कांबळे, सागर, सचिन तोडकर, बंडा देसाई, अमोल माने, उल्हास भंडारी, अतुल माने, योगेश माने, चैतन्य माने, किरण माने, इ. मान्यंवरानी शुभेच्छा दिल्या. 

समाजाला तिमिरातून तेजाकडे घेवून जाणारी 'उजेडवाती'

Image
  समाजाला तिमिरातून तेजाकडे घेवून जाणारी 'उजेडवाती'                         गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट:-         कवी गुलाब मोहिते यांचे कवितेतील पहिले पाऊल म्हणजे 'उजेडवाती' हा कवितासंग्रह होय. या कवितासंग्रहामध्ये एकूण ७० स्फूट कवितांचा समावेश आहे. मुखपृष्ठावर उगवणाऱ्या सूर्याबरोबर अंधःकार नष्ट करणाऱ्या किरणांचे चित्र रेखाटले आहे; सूर्योदयापासून मानवाची जगण्याची धडपड, दुःख  संपुष्टात आणण्याची आस, स्व अस्तित्वाचा शोध घेण्याची वृत्ती; असा आशावादी प्रयत्न करणारा मानव सूर्याच्या दिशेने निघाला आहे.         गुलाब मोहिते यांचा कवितासंग्रह उजेडाचा किरण सोबत घेऊन अंधकारमय विश्वात प्रवेश करीत आहे. वेगवेगळे आशय आणि शीर्षक यानुसार या कवितांची रचना दिसते. वृद्धाश्रम ही पहिलीच कविता भावनिक बंध आणि बदललेला समाज यांचे वास्तव टिपते. शिक्षण नोकरी व्यवसाय या निमित्ताने नात्यातील अंतर वाढत आहे. मानवाच्या धावत्या जीवनप्रणालीमुळे नाती दुरावत चालली आहेत. आज वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहे...

सह्याद्री साखर कारखान्यात बॉयलरचा स्पोट.

Image
  सह्याद्री साखर कारखान्यात बॉयलरचा स्फोट. कराड - प्रतिनिधी. यशवंतनगर, ता. कऱ्हाड येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्यात ईएसपी बॉयलरची चाचणी घेत असताना बॉयलरचा स्फोट झाला. गुरूवारी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या दुर्घटनेत तीन ते चार कर्मचारी  जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. जखमींना तात्काळ उपचारासाठी खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले आहे.जखमीमध्ये शैलेश भारती (वय ३२, रा. उ.प्रदेश), अमित कुमार (वय १९, रा. बिहार), धर्मपाल (वय १९, रा. उ. प्रदेश ) अशी जखमीची  नावे आहेत. यशवंतनगर येथे सह्याद्री सहकारी साखर कारखान्यात ऊसाचे गाळप सुरू आहे. पंधरा दिवसापूर्वी ईएसपी बॉयलर कारखान्यात बसविण्यात आला आहे. त्याची आठ दिवसापासून चाचणी सुरू आहे. गुरूवारी सकाळच्या सुमारास चाचणी सुरू असताना तेथे मोठा स्फोट झाला. त्या दुर्घटनेत चाचणीचे काम करणारे तीन ते चार कर्मचारी जखमी झाले असून त्यांना तात्काळ उपचारासाठी खासगी रूग्णालयात हलविण्यात आले आहे. कारखानास्थळावर पोलिसयंत्रनेसह आपत्कालीन यंत्रणा दाखल झाली आहे.

हरीत सेनेच्या विद्यार्थ्यांचे जैवविविधता संवर्धनासाठी अनोखा उपक्रम.

Image
हरीत सेनेच्या विद्यार्थ्यांचे जैवविविधता संवर्धनासाठी अनोखा उपक्रम.    उंडाळे -प्रतिनिधी. उन्हाच्या प्रचंड तडाख्याने पक्षांना होणारा त्रास लक्षात घेऊन  २० मार्च या जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून येथील स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर विद्यालयातील हरीत सेनेचे विद्यार्थी व एस आर दळवी फाउंडेशन व निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, यांच्या संयुक्त विद्यमाने हरीत  सेनेच्या विद्यार्थ्यांनी पक्षांसाठी शाळेच्या परिसरात ठिकठिकाणी पाणी, खाद्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.या उपक्रमाचे  परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.  सध्या उन्हाळ्याची तीव्रता प्रचंड वाढली आहे. निसर्गात पाण्याची कमतरता जाणवू लागलेली आहे. त्यामुळे माणसाबरोबर पशुपक्ष्यांचे प्रचंड हाल होत आहेत. पाण्याअभावी पक्षी मृत होत आहेत. पाण्यासाठी पशु - पक्षी धडपडताना दिसत आहेत. सध्या शिवारात पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आहे त्यामुळे पक्षांना खाद्य मिळत नाही. पक्षांची हि अवस्था पाहून प्राचार्य बी आर पाटील, पर्यवेक्षक जे एस माळी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय हरीत सेनेच्या विद्यार्थ्यांनी पशूपक्षासाठी...

मलकापूरमध्ये महाकुंभतीर्थ कलशाचे भाविकांनी घेतले दर्शन.

Image
  मलकापूरमध्ये महाकुंभतीर्थ कलशाचे भाविकांनी घेतले दर्शन. मलकापूर / प्रतिनिधी अनुगामी लोकराज्य महाअभियान (अनुलोम) या संस्थेमार्फत कराड तालुक्यातील मलकापूर येथे प्रयागराज येथून आणलेला महाकुंभतीर्थ कलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. अनुलोम भागप्रमुख सुहास कळसे यांच्या मार्फत शास्ञीनगर येथील माता काळूबाई व म्हसोबा देवस्थान मंदिर येथे भाविकांना दर्शनासाठी हा कलश ठेवण्यात आला.          यावेळी परिसरातील विविध जातीधर्मांच्या ११ जोडप्यांमार्फत कलशाचे पूजन करुन सार्वजनिक महाआरती करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते तानाजी देशमुख, देवस्थानचे अध्यक्ष शंकरराव सोनवले,सुर्यकांत पाटील, रामेश्वर आळसे महाराज, विलासराव साळुंखे,मुरलीधर शिंदे, आण्णा डिसले, सुनिल मगदुम,सुरज बांडगी,मंगेश सुरवसे, तेजस सोनवले,किशोर नांगरे,संदिप शिंगण,किरण रोकडे,शुभम मडके,अविनाश पाटील,संकेत शिंगण, तानाजी रांजणे,विठ्ठल थोरात,मल्लिकार्जून करपे, नंदकुमार गायकवाड, रुषीकेश सुरवसे, बजीरंग गोडगे, अनुलोमच्या आयामातील नागरिक,वारकरी,महिलाभगीनींची बहुसंख्येने उपस्थिती होती.  

वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागाव मध्ये व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम संपन्न.

Image
  वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागाव मध्ये व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम संपन्न. शिराळा - प्रतिनिधी. वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागाव मध्ये व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत अंजनी पाटील यांनी केले.प्रारंभी विद्यालयात धर्मवीर , स्वराज्य रक्षक छ. संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त छ. संभाजी महाराज विनम्र अभिवादन करण्यात आले.विद्यालयात व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रमाप्रसंगी व्यसनमुक्ती शपथ घेतली. विद्यालयातील भरत नलवडे सर यांनी व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रमाप्रसंगी व्यसन, व्यसनाचे प्रकार व त्यांचे दुष्परिणाम याविषयी व्याख्यान दिले. आज राष्ट्रीय सर्वेक्षणानुसार शालेय व महाविद्यालयीन स्तरावर वाढती  व्यसनाधीनता मोठी समस्या समोर येत आहे. ते रोखणे ही काळाची गरज आहे. वाढत्या व्यसनाधीनतेमुळे पीढी संकटात सापडली असून त्यातून पीढीला मुक्त करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे असे प्रतिपादन केले.याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक,सर्व शिक्षक ,शिक्षिका व शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी , विद्यार्थिनी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे नियोजन तसेच मार्गदर्श...

मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व: उज्वल भविष्यासाठी पाऊल.

Image
  मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व: उज्वल भविष्यासाठी ठोस पाऊल. आजच्या आधुनिक युगात शिक्षण हा केवळ आत्मसात करण्याचा भाग नाही, तर तो एक सशक्तीकरणाचा महत्त्वाचा मार्ग बनला आहे. विशेषतः मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व हे केवळ त्यांच्या वैयक्तिक उन्नतीपुरते मर्यादित नाही, तर संपूर्ण समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे. शिक्षित महिला केवळ स्वतःचे आयुष्य घडवत नाही, तर पुढच्या पिढीसाठीही योग्य मार्गदर्शन आणि संस्कार देऊ शकते. शिक्षणाचा प्रभाव आणि आवश्यकता. मुलींचे शिक्षण ही समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वात महत्त्वाची गुंतवणूक आहे. शिक्षित मुलगी आत्मनिर्भर होते, आत्मविश्वासाने निर्णय घेऊ शकते आणि कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्याची क्षमता प्राप्त करू शकते. आज अनेक क्षेत्रांमध्ये महिलांनी आपल्या शिक्षणाच्या जोरावर नावलौकिक मिळवला आहे. डॉक्टर, अभियंता, शिक्षक, उद्योजक, सैन्य अधिकारी आणि वैज्ञानिक अशा विविध क्षेत्रांत महिलांनी आपले स्थान निर्माण केले आहे. शिक्षणामुळे महिलांना आर्थिक स्वावलंबन प्राप्त होते आणि त्यामुळे त्यांना आपली स्वतःची ओळख निर्माण करता येते. शिक्षित स्त्री आपल्या कुटुंबासह संपूर्ण...

संपादक आनंदा सुतार यांना आदर्श पत्रकार पर्सन ऑफ द ईयर पुरस्कार जाहीर.

Image
  संपादक आनंदा सुतार यांना आदर्श पत्रकार पर्सन ऑफ द ईयर पुरस्कार जाहीर. कार्वे प्रतिनिधी :- प्रविण पाटील.  पर्सन ऑफ द ईयर २०२५ समाज गुणगौरव  पुरस्कार प्रदान समारंभ सामाजिक सेवाभावी संस्था आदर्श फाऊंडेशन यांच्या वतीने पत्रकारितेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांना आदर्श पत्रकार पर्सन ऑफ द ईयर पुरस्कार जाहीर झाले आहेत.दैनिक लोकमतचे चे (पत्रकार) तसेच साप्तहिक वसंतसागर चे मुख्य संपादक आनंदा सुतार यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ६० जणांना विविध पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष विजय लोहार यांनी दिली.      महिला दिनाचे औचित्य साधून शनीवार (दि.८) रोजी दुपारी दोन वाजता दसरा चौक  येथील शाहु स्मारक भवन कोल्हापूर येथे सभागृहात मा. निवेदिता माने, वहिनीसाहेब माजी खासदार, कोल्हापूर मा. एम. के. गोंधळी सर, निवृत्त शिक्षण सहसंचालक यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार आहे. पुरस्काराचे यंदाचे हे २२ वे वर्ष आहे.            कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. आ. भगवानराव साळुंखे, माजी शि...

कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्सवात संपन्न.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्सवात संपन्न. उंडाळे -प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील वैभवी वरगंटे, अस्मिता महानवर, स्नेहल विरकर, करीना करांडे, अंकिता पाटील, हर्षानी जाधव या विद्यार्थिनींनी कविता,  निबंध, ललित लेख व नाटक यांचे सादरीकरण केले . यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जयश्री जगदाळे यांनी केले.

जालना येथील संशयित आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करा.

Image
जालना  घटनेतील संशयित आरोपींवर  मकोका अंतर्गत कारवाई करा.                      ____मा.अनिकेत भाऊ साळुंखे.  कराड - प्रतिनिधी.  मा.अनिकेत भाऊ साळुंखे (महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष फकिरा पँथर सेना ) यांच्या उपस्थितीत  समाजभूषण संदीप तात्या ठोंबरे ( संस्थापक अध्यक्ष फकिरा पँथर सेना ) यांच्या अदेशाने कराड येथील तहसीलदार कार्यालयात तसेच कराड शहर पोलीस ठाण्यात, जालना येथील झालेल्या अमानुष अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी यासाठी निवेदन देण्यात आलं. कैलास बोराडे हे मंदिरात जाण्यासाठी आलेले होते. परंतु तेथील गुंढ प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांना अडवले व त्यांच्यावर अमानुषपणे मारहाण केली. चुलीवर तापवलेल्या रॉड च्या सहाय्याने केलास यांच्या गुप्त अंगावर चटके देण्यात आले त्यांना जीवे मरणाचा प्रयत्न झाला.  अश्या प्रवृत्तीच्या गुन्हेगारांना महाराष्ट्र राज्य सरकारने आळा घालण्यासाठी मकोका अंतर्गत कारवाई  करून जनतेला सुरक्षित ठेवावे, ही मागणी अनिकेत भाऊ साळुंखे यांनी निवेदनाद्वारे केली ...

सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा: दयानंद शिवजातक .

Image
  सेन्सॉर बोर्डाच्या  अधिकाऱ्यांवर कारवाई करा: दयानंद शिवजातक.    शिराळा - प्रतिनिधी. गावकुसाबाहेरच्या समाजाच नग्न प्रतिबिंब दाखवणारा विद्रोही साहित्यीक '  दलित -शोषित- पिडीत व उपेक्षित घटकांच्या न्याय व हक्कासाठी लढणारा - विद्रोह -आक्रोश करणारा बंडखोर योद्धा ;  दलित पँथरचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री नामदेवरावजी ढसाळ यांच्या जीवन चरित्रावरील महेश बनसोडे दिग्दर्शित " चल हल्ला बोल '  या चित्रपटास परवानगी नाकारुन " कोण है नामदेव ढसाळ ?आम्ही ओळखत नाही" अशा पध्दतीची अवमानकारक नोटीस देणाऱ्या सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्यावर तात्काळ कारवाई व्हावी अशी मागणी  भारतीय दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष दयानंद शिवजातक यांनी तहसीलदार श्यामला खोत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.       हिंदी , इंग्रजी व मराठी चित्रपटातील  हिंसेला व अश्लिलतेला  प्राधान्य देवून त्यांना परवानगी देणाऱ्या सेन्सॉर बोर्डाला जागतिक दर्जाचे साहित्य निर्मान करणाऱ्या पद्मश्री नामदेवरावजी ढसाळ यांच्या कविता अश्लिल व शिवराळ असल्याची कारणे देवून चित्रपटास परवानगी न...

धनंजय मुंडे यांचा राजीनामा.

Image
        धनंजय मुंडेंचा राजीनामा.  ब्युरो रिपोर्ट -शकुर मुल्ला. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आज (मंगळवारी) आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपल्या सहाय्याकांमार्फत आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. मुख्यमंत्र्यांनी हा राजीनामा स्वीकारला असून तो पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे. त्यामुळे धनंजय मुंडे.हे मंत्रिपदावरुन पायउतार झाले आहेत. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी ट्विट करुन पहिली प्रतिक्रिया दिली. धनंजय मुंडेंनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय? बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी...

पवित्र रमजान महिना आणि रोजाचे महत्व.

Image
  पवित्र रमजान महिना आणि रोजाचे महत्व. रमजान म्हणजे बरकती आणि ईद म्हणजे स्नेहभाव वाढविणारा हा महिना, हा महिना मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो.रमजान मंगल्याचे प्रतीक आहे पवित्र कुराणचे अवतरण याच महिन्यात झाल्यामुळे इस्लाममध्ये रमजानला महत्व दिले जाते. त्यामुळे रमजानची रात्र हजार रात्री पेक्षा मोठी रात्र मानली जाते. या रात्रीस पूर्ण वेळ मस्जिद मध्ये नमाज पठण करने अल्लाहच्या (खुदा) समीप जाने होय. रमजानच्या रात्री पठण केलेल्या नमाजचा मोबदला सत्तरपटीने जास्त असतो.    रमजान महिन्याचे तीन हिस्से. रमजान इस्लामी कॅलेंडर नुसार नववा महिना असतो. रमजान महिन्याचा पहिला हिस्सा कृपेचा  दुसरा क्षमेचा आणि तिसरा हिस्सा केलेल्या चुकापासून मुक्ततेचा मानला जातो.या महिन्या अल्लाह क्षमादान देईल व केलेल्या चुका माफ करेल. त्यामुळे वर्षभरातील आकरा महिन्यात मिळणारी नेकी (पुण्याई) सत्तर पटीने जास्त असते.त्यामुळे मुस्लिम बांधव जास्तीजास्त नेकी (पुण्य)मिळविण्यासाठी  पवित्र रमजान महिन्यात पाणी अन्न आणि वेळेचा त्याग करून अल्लाहची प्रार्थना करतात.  रमजान मध्ये रोजा याचा अर्थ स...