Posts

Showing posts from September, 2025

विश्वस्तरावर हिंदी भाषेचा विकास : प्रा.डॉ. दिलीपकुमार कसबे

Image
  विश्वस्तरावर हिंदी भाषेचा विकास : प्रा.डॉ. दिलीपकुमार कसबे   महिला महाविद्यालयात हिंदी सप्ताह संपन्न. कराड - प्रतिनिधी.                दि. 14 सप्टेंबर, 1949  रोजी भारतीय संविधानामध्ये हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्यात आला. या दिवसाच्या निमित्ताने हिंदी विभागाद्वारे हिंदी सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहामध्ये काव्यवाचन, वक्तृत्व, चित्रकला, यासारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या सप्ताहाच्या समारंभासाठी स.गा.म.कॉलेजचे पूर्व हिंदी विभाग अध्यक्ष प्रा. डॉ. दिलिपकुमार कसबे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ते आपल्या भाषणात म्हणाले “देशाच्या विकासासाठी त्रिसूत्री भाषेचे पालन केले पाहिजे. हिंदी भाषा वैश्विक भाषा बनत आहे.” या समारंभाचे अध्यक्ष म्हणून महिला महाविद्यालय, कराडचे प्राचार्य डॉ. भरत बल्लाळ सर उपस्थित होते. ते आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये म्हणाले  “हिंदी सर्वाधिक लोकांद्वारे बोलली जाणारी व समजली जाणारी मृदू भाषा आहे.या भाषेला सर्वांनी अंगीकृत केले तर साहित्य सृजनतेत भर पडेल”.याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचा...

रासेयो च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कर्तव्याला कृतीची जोड मिळाल्याने, राष्ट्राचा शाश्वत विकास साधता येतो.

Image
  रासेयो च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कर्तव्याला कृतीची जोड मिळाल्याने, राष्ट्राचा शाश्वत विकास साधता येतो. ______ प्रा. जालिंदर काशीद.   कराड - प्रतिनिधी.  श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे राष्ट्रीय सेवा योजना दिन व शैक्षणिक वर्ष 2025 26 चे उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय प्रा. जालिंदर काशीद होते. आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कर्तव्याला कृतीची जोड मिळाल्याने राष्ट्राचा शाश्वत विकास होतो. आपल्या अवतीभवती विविध समस्या आहेत. त्या एक दिवसात किंवा काही क्षणात संपणाऱ्या नसतात. त्या निरंतर उपलब्ध असतात. त्या कमी करण्यासाठी आपले प्रयत्न सतत असले पाहिजे. आधुनिक युगात ज्ञान तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. त्याचबरोबर पर्यावरणाचा ऱ्हास देखील होत आहे. विकासाबरोबर पर्यावरणाचे संरक्षण हे सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे. हेच कर्तव्य राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आपल्याला करण्याची संधी आहे. पर्यावरण विषयक अनेक कायदे आहे...

उपविभागीय जलसंधारण अधिकारी लक्ष्मण मंडले यांचा कराड ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी केला सन्मान.

Image
  उपविभागीय जलसंधारण अधिकारी लक्ष्मण मंडले यांचा कराड ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी केला सन्मान. उंडाळे - प्रतिनिधी.   मनव ता. कराड गावचे सुपुत्र ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता लक्ष्मण मंडले यांची पदोन्नती होऊन त्यांची उपविभागीय जलसंधारण अधिकारी गट अ या  पदावर शहापूर ठाणे जिल्हा या ठिकाणी पदोन्नतीने बढती झाली. सर्वसामान्य कुटुंबातील लक्ष्मण मंडले यांचा शाखा अभियंता ते उपविभागीय जलसंधारण अधिकारी हा प्रवास खूप प्रेरणादायी आहे, याबद्दल कराड ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांचे हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला, व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात  आल्या यावेळी ,पोलीस उपनिरीक्षक एस. जाधव, पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे उपस्थित होते, मंडले यांच्या पदोन्नती बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे, यामध्ये कराड ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सुद्धा त्यांचे  अभिनंदन करण्यात आले, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रताप पाटील यासह  सर्व अधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. खा.श्रीनिवासजी  पाटील, कराड दक्षिणचे आ...

राज्यातील साखर कारखान्यानी शेतकऱ्यांच्या उसाला अधिकाधिक दर देण्याचा प्रयत्न करावा.

Image
  राज्यातील साखर कारखान्यानी शेतकऱ्यांच्या उसाला अधिकाधिक दर देण्याचा प्रयत्न करावा  ____कृषी मंत्री दत्तात्रय भरणे. कृषीमंत्र्यांच्या हस्ते द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या ७० व्या वार्षिक अधिवेशन आणि साखर प्रदर्शनाच्या उद्घाटन पुणे, दि.२२ : (जिमाका वृत्तसेवा): देशात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला उच्चांकी दर देणाऱ्या साखर कारखान्यांच्या कामकाजाची माहिती घेऊन इतर साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचा उसाला अधिकाधिक दर देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला भाव, कामगारांना वेळेत वेतन, बोनस देणाऱ्या साखर कारखान्यांना राज्य शासनाच्यावतीने सहकार्य येईल, असे प्रतिपादन राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या ७० व्या वार्षिक अधिवेशन आणि साखर प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार अभिजित पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकचे प्रशासक विद्याधर अनास्कर, सहकार आयुक्त दीपक तावरे,  यशदाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. शेखर गायकवाड,द वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी...

हजेरी घोटाळा मास्तरला चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा.

Image
  हजेरी घोटाळा मास्तरला चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा. वीस हजार रूपयांचा दंड. शासनाची केली फसवणूक. गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट:-   रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयातील शिक्षक रामचंद्र गवळी यांना हजेरी घोटाळा करणे महागात पडले. जव्हार येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी माया मथुरे यांनी गवळी यांना चार वर्षे सक्त मंजुरीची शिक्षा व 20 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे दांड्या मारल्या नंतरही मस्टर मध्ये झोल करणाऱ्या तसेच अन्य अस्तापनातील कर्मचाऱ्यांचे  धाबे दणाणले आहेत.  रयत शिक्षण संस्थेच्या दहिवडीत सातारा महाविद्यालयातून गवळी यांची मोखाडा येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात बंदी झाली होती कार्यमुक्त आदेश मिळूनही मोखाडा महाविद्यालयात तब्बल तीन महिन्यानंतर रुजू झाले. असे असतानाही मागील 53 दिवसाच्या गैरहजर काळातील हजेरीपटावर बोगस सह्या करून पगार घेतल्याचा आरोप संस्थेने केला. ही बनावगिरी महाविद्यालयाच्या प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर तात्कालीन प्राचार्य रमेश भोर यांनी मोखाडा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली होती.  महाविद्यालयाने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी या...

महिलांनी स्वतःचे आरोग्य जपणे हीच यशस्वी संसाराची गुरुकिल्ली _____ डॉ. संचिता यादव.

Image
  महिलांनी स्वतःचे आरोग्य जपणे हीच यशस्वी संसाराची गुरुकिल्ली  _____ डॉ. संचिता यादव.   कराड - प्रतिनिधी.  श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे महिला सक्षमीकरण आणि लिंग समानता आणि अंतर्गत तक्रार निवारण समिती यांचे संयुक्त विद्यमाने घेतलेल्या उजळणी वर्गात "महिलांचे आरोग्य आणि पीसीओडी जनजागृती" या विषयावरती माऊली हॉस्पिटल कराड येथील डॉ. संचिता  यादव यांचे व्याख्यान संपन्न झाले. आपल्या मार्गदर्शनात त्या म्हणाल्या, महिलांनी स्वतःचे आरोग्य जपणे हिच यशस्वी संसाराच्या यशाची गुरुकिल्ली आहे!  आजच्या काळात मुली व महिला यामध्ये पीसीओडी चे प्रमाण वाढले आहे. त्याची कारणे काय आहेत व त्यावर ती उपचार काय घेतले पाहिजेत याबद्दल महिला जागृती हवी. यासाठी योग्य आहार घेणे महत्त्वाचे आहे. दररोजचा व्यायाम महिलांनी करावा. पीसीओडी मुळे वजन वाढणे, केस गळणे, चेहऱ्यावरती मुरूम येणे, गोड खावेसे वाटणे, काखेत, गळ्याला चट्टे पडणे, असा प्रादुर्भाव होतो. यासाठी संतुलित जीवनशैली जगता आली पाहिजे. शरीराला चुकीच्या सवयी लागल्या की शारीरिक ...

जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिम

Image
 जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिम   सांगली, दि. 19 (जि. मा. का.) :  राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अंतर्गत दिनांक 17 सप्टेंबर ते 02 ऑक्टोंबर 2025 या कालावधीत इयत्ता 11 वी व 12 वी विज्ञान शाखेतील/डिप्लोमा तृत्तीय वर्षातील सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव मेघराज भाते यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.   सन २०२६-२७ या चालू शैक्षणिक वर्षात इ.१२ वी विज्ञान शाखेमध्ये व पदवीका तृतीय वर्षात शिकत असलेल्या अनु. जाती., विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग व सा.शै.मा.प्र. (मराठा) (SC, VJ, NT, OBC, SBC, SEBC) या संवर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी विहीत नमुन्यातील जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज त्यांच्या शैक्षणिक संस्थेच्या शिफारशीसह दि. ३१ जानेवारी २०२६ पर्यंत समिती कार्यालयाकडे सादर करावेत.  अर्जदारांनी https://ccvis.barti.in या संकेतस्थळावर विहीत नमुन्यातील ऑनलाईन अर्ज भरावा. महाव...

वाणिज्य व व्यवस्थापनातील सध्याचा कल पाहून विद्यार्थ्यांनी अध्ययन करणे काळाची गरज

Image
  वाणिज्य व व्यवस्थापनातील सध्याचा कल पाहून विद्यार्थ्यांनी अध्ययन करणे काळाची गरज __________ डॉ. ज्योती मोहोळकर.   कराड - प्रतिनिधी श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे वाणिज्य विभागाच्या वतीने वाणिज्य व व्यवस्थापना मधील अलीकडील प्रवाह या विषयावरती व्याख्यान संपन्न झाले. प्रमुख व्याख्यात्या  डॉ.ज्योती मोहोळकर सहाय्यक प्राध्यापिका महिला महाविद्यालय कराड होत्या. त्या म्हणाल्या,वाणिज्य व्यवस्थापनातील सध्याचा कल पाहून विद्यार्थ्यांनी अध्ययन करणे काळाची गरज आहे. सध्याचे युग हे तंत्रज्ञान व डिजिटलायझेशनचे आहे. ए. आय. चा वापर वाढत आहे. सध्याच्या व्यापाराची बाजाराची बदलती परिस्थिती पाहता त्या समकक्ष अध्ययनाची अत्यंत आवश्यकता आहे. काळाबरोबर ज्ञानाच्या कक्षा उंचावलेल्या आहेत. वाणिज्य क्षेत्रात ई-कॉमर्स, डिजिटल पेमेंट, ग्रीन कॉमर्स, गिग इकॉनोमी, ब्लॉग चेन इत्यादींचा वापर होत आहे. या सर्वांचे ज्ञान असणे अपेक्षित आहे. याशिवाय व्यवस्थापन क्षेत्रामधील ई-गव्हर्नन्स व डिजिटल मॅनेजमेंट, हायब्रीड कल्चर,  मानवी संसाधनातील बदल, का...

कलेच्या आस्वादाने चांगला माणूस घडतो

Image
  कलेच्या आस्वादाने  चांगला माणूस घडतो __प्रा. प्रदीप पाटील. कराड : प्रतिनिधी. येथील शिक्षण मंडळ, कराड आयोजित महिला महाविद्यालय ,कराड येथे पाचवे विद्यार्थी साहित्य संमेलन व ग्रंथ प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या संमेलनासाठी अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक व वक्ते प्रा. प्रदीप पाटील, इस्लामपूर हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्व. लोकमान्य टिळक व स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर सरस्वतीपूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.संमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रदीप पाटील म्हणाले की,स्त्रियांनी शेतीचा शोध लावला व साहित्यनिर्मिती  सुरुवातही स्त्रियांनी केली.जगातील अनेक शोधनिर्मितीत स्त्रियांचा सहभाग  आहे हे त्यांनी आवर्जून सांगितले. साहित्याची निर्मिती ही भाषेतून होते. ती जगण्याशी निगडित असते. कला आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करते. जीवनातील स्वर व सूर यांचे वेगळेपण त्यांनी दाखवून दिले.चिमणी आणि कावळा यांच्या गोष्टींतून शेण व मेणाचा संबंध स्त्रियांच्या संवेदनशीलतेशी असल्याचे स्पष्ट क...

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्यात संशोधक वृत्ती वाढवण्याचे प्रमुख साधन म्हणजे अविष्कार संशोधन स्पर्धा.

Image
  महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्यात संशोधक वृत्ती वाढवण्याचे प्रमुख साधन म्हणजे अविष्कार संशोधन स्पर्धा ____ प्रो. डॉ. उज्ज्वला ताठे   कराड - प्रतिनिधी.  श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे महाविद्यालयीन स्तरावरती अविष्कार संशोधन स्पर्धा 2025 /26 उत्साहात संपन्न झाली. स्पर्धेचे प्रमुख परीक्षक व प्रमुख पाहुणे म्हणून प्रो.डॉ उज्वला ताठे इंग्रजी विभाग प्रमुख महिला महाविद्यालय कराड या होत्या. आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात त्या म्हणाल्या, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्यात संशोधक वृत्ती वाढवण्याचे प्रमुख साधन म्हणजे अविष्कार स्पर्धा होय. या स्पर्धेत सहभागी होताना विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास असेल तर सादरीकरण उत्तम होते. . प्राथमिक व द्वितीयक माहितीच्या आधारे विद्यार्थ्यांनी अचूक पुराव्यासह संशोधन प्रकल्प तयार केला पाहिजे.  आवश्यक आकडेवारी, नकाशे व सांख्यिक माहितीच्या आधारे पोस्टर शास्त्रीय पद्धतीने तयार करणे अपेक्षित असते. यासाठी विद्यार्थ्यांनी स्वय: अध्ययनावर भर दिला पाहिजे. विषय समजून घेऊन गृहीतकांची मांडणी...

आमदार डॉ.अतुलबाबा भोसले यांचेकडून साळशिरंबे-खुडेवाडी गावच्या विकासासाठी भरघोस निधी.

Image
आमदार डॉ.अतुलबाबा भोसले यांचेकडून साळशिरंबे-खुडेवाडी गावच्या विकासासाठी भरघोस निधी. उंडाळे -प्रतिनिधी. आमदार मा.डॉ.अतुलबाबा भोसले यांच्या कडून,साळशिरंबे-खुडेवाडी गावच्या विकासासाठी भरघोस निधी मंजूर केला आहे.भाजपा सातारा जिल्हा सोशल मिडीय उपाध्यक्ष, युवा नेते, मा.पंकज पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे, भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष, कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार मा.डॉ.अतुलबाबा भोसले यांच्या कडून,साळशिरंबे-खुडेवाडी गावच्या विकासासाठी एकूण 81 लक्ष रु. निधी मंजुर साळशिरंबे - आमदार स्थानिक जनसुविधा निधी मधून रस्ता कॉक्रेटीकरण व नाला बांधणे 7 लक्ष रु. निधी, प्राथमिक जिल्हा परिषद शाळा साळशिरंबे खोली बांधणे 15 लक्ष रु. निधी, गावातील 2 पानंद रस्ते 4 कि.मी. 40 लक्ष रु. निधी, वाढीव वस्ती साठी 23 लाईटचे पोल साठी 4 लक्ष रु.निधी मंजुर व खुडेवाडी येथे- स्मशानभुमी रस्ता कॉक्रेट करणे 10 लक्ष रु. निधी व गाव अंतर्गत कॉक्रेटीकरण करणे 5 लक्ष रु. निधी मंजूर, हा सर्व निधी मंजूर केल्याबद्दल  आमदार मा.डॉ.अतुल बाबा भोसले व या कामांसाठी पाठपुरावा करणारे मा.पंकज पाटील यांचे साळशिरंबे गावच्या सरपंच सौ.प्रमिला क...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये जागतिक ओझोन दिन साजरा.

Image
  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये जागतिक ओझोन दिन साजरा.     सोलापूर :-  भूशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. विनायक धुळप उपस्थितांना मार्गदर्शन करताना. सोलापूर -प्रतिनिधी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या भूशास्त्र संकुलाच्यावतीने १६ सप्टेंबर २०२५ रोजी जागतिक ओझोन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमातून ओझोन थराचे महत्त्व, त्याचे संरक्षण, पर्यावरणपूरक जीवनशैली आणि जनजागृती या विषयांवर विचारमंथन झाले. कार्यक्रमाची सुरुवात संकुलाचे संचालक डॉ. विनायक धुळप यांच्या हस्ते रोपांना पाणी देऊन करण्यात आली. अध्यक्षीय भाषणात डॉ. धुळप यांनी ओझोन थराचे महत्त्व, त्यास होणारे धोके आणि त्याच्या संरक्षणासाठी आवश्यक उपाय यावर मार्गदर्शन केले. डॉ. अनिल येडगे यांनी पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनीही ओझोन संरक्षणाविषयी आपली मते व्यक्त केली. या दिनाचे औचित्य साधून संकुलात ओझोन थर आणि त्याचे संरक्षण या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्याने, वादविवाद स्पर्धा, डॉक्युमेंटरी प्रेझेंटेशन तसेच ओझोन संरक्षणाची शपथ अशा विविध उपक्रमांच...

राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीचे उपयुक्त माध्यम म्हणजे हिंदी भाषा.

Image
  राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीचे उपयुक्त माध्यम म्हणजे हिंदी भाषा. ___डॉ. वैशाली शिंदे   कराड - प्रतिनिधी .  श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे हिंदी दिन समारोह उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज कडेपुर. जिल्हा. सांगलीच्या डॉ. वैशाली शिंदे होत्या. त्या आपल्या मार्गदर्शनात म्हणाल्या, राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक देवाण-घेवाणीचे उपयुक्त माध्यम म्हणजे हिंदी भाषा आहे. भारतीय संविधानाने हिंदी ला राज भाषेचा दर्जा दिला आहे. हिंदी भाषेविषयी प्रत्येक व्यक्तीला आकर्षण आहे. कारण संपूर्ण भारतामध्ये सर्वात जास्त बोलली जाणारी ही भाषा आहे. स्वातंत्र्य काळात देशातील अनेक स्वातंत्र्यवीरांनी संपूर्ण देशभर हिंदी भाषेतच भाषणे केलेली होती . त्यामुळेच योग्य संदेश लोकांच्या पर्यंत पोहोचत होते. येणाऱ्या काळात हिंदी भाषेचा प्रचार व प्रसार होऊन सांस्कृतिक देवाण-घेवाण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.              कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालया...

राष्ट्रीय लोकअदालत मध्ये 1817 वादपूर्व प्रकरणे निकाली

Image
  राष्ट्रीय लोकअदालत मध्ये 1817 वादपूर्व प्रकरणे निकाली एकूण वीस कोटी अडोतीस लाख दहा हजार पाचशे तेहतीस रुपयांची वसुली. सातारा दि. 15 (जिमाका):  दि 13 सप्टेंबर 2025 रोजी आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकअदालत मध्ये सातारा जिल्ह्यातील एकूण 1817 वादपूर्व प्रकरणे निकाली काढून एकूण  वीस कोटी अडोतीस लाख दहा हजार पाचशे तेहतीस रुपयांची वसुली करण्यात आली.   वादपूर्व 15622 प्रकरणांपैकी 3205 प्रकरणे निकाली काढून एकूण रुपये चार कोटी सोळा लाख शेहचाळीस हजार तीनशे चार रुपयांची वसुली करण्यात आली.  दि. 8 ते 12 सप्टेंबर या कालावधीमधील स्पेशल डाईव्‌ह मध्ये एकूण 840 प्रकरणे निकाली काढण्यात आली.  यामध्ये वैवाहिक वाद, तडजोडपात्र दिवाणी व फौजदारी केसेस, भूसंपादन प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाईची प्रकरणे, कर्ज, धनादेश न वटल्याची प्रकरणे इ. समावेश आहे. वादपूर्व प्रकरणात फायनान्स कंपन्या, बॅकांची कर्ज, ग्रामपंचायत मालपत्ता पाणीपट्टी कर वसुली प्रकरणे,  विद्युत देयके, दूरध्वनी व भ्रमणध्वनी देयके इ. समावेश होता. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जेष्ठ नागरिक व त्यांच्या मुलांमध्ये सम...

शालेय विद्यार्थ्यांना ‘इन्स्पायर मानक’ योजनेमध्ये सहभागी होण्याची १५ सप्टेंबरपर्यंत संधी.

Image
  शालेय विद्यार्थ्यांना ‘इन्स्पायर मानक’ योजनेमध्ये सहभागी होण्याची १५ सप्टेंबरपर्यंत संधी.   सातारा- प्रतिनिधी.  विद्यार्थ्यांमधील नाविन्यपूर्णता आणि कल्पकतेला वाव मिळावा यासाठी राबविण्यात येणारी ‘इन्स्पायर मानक योजना’ (INSPIRE-MANAK) शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून अधिक व्यापक करण्यात आली आहे. यापूर्वी या योजनेत केवळ इयत्ता सहावी ते दहावीतील विद्यार्थी सहभागी होऊ शकत होते; मात्र यावर्षीपासून अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनाही यात समाविष्ट करण्यात आले आहे. या योजनेचा मुख्य उद्देश देशभरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधून तब्बल १० लाख समाजोपयोगी, उपयुक्त व नाविन्यपूर्ण कल्पनांची निवड करून विद्यार्थ्यांना त्या कल्पनांचे प्रोटोटाइप व उत्पादने तयार करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या विज्ञानविषयक जिज्ञासेला चालना मिळून त्यांची सृजनशीलता व उपक्रमशीलता विकसित होत असते. सदर योजने करिता सर्व शासनमान्य नोंदणीकृत शाळांमधील इयत्ता सहावी ते बारावीतील पर्यंत शिकणारे विद्यार्थी आपल्या अभिनव कल्पना सादर करण्यास पात्र असतात. प्रत्येक नोंदणीकृत शाळेला दरवर्षी प...

शिव केदार विद्यालात अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा व राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धा संपन्न.

Image
शिव केदार विद्यालात अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा व राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धा संपन्न. 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹 शिराळा - प्रतिनिधी. शिव केदार विद्यालय,कांदे ,ता. शिराळा येथे अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा व राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धा संपन्न झाली.अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा 2025 आणि राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धा 2025- 26 या स्पर्धेचे उद्घाटन मा. श्री. पोपटराव मलगुंडे साहेब गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती शिराळा यांचे शुभ हस्ते पार पडले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान मा. संजय पाटील सर मुख्याध्यापक अध्यक्ष, विज्ञान गणित अध्यापक मंडळ सांगली जिल्हा यांनी भूषविले. या कार्यक्रमास मा. निवासराव पाटील काका,संचालक वारणा विकास शिक्षण मंडळ कांदे उपस्थित होते.तसेच यावेळी मा. सौ. स्मिता पाटील मॅडम मा. सौ. सीतांजली जाधव मॅडम,मा. सौ. तेजश्री पाटील मॅडम,श्री. लहू कांबळे, श्री.आनंदा बंडगर, श्री. अमोल सपाटे उपस्थित होते .कु. आदिती विलास भोईटे इ. दहावी या विद्यार्थिनींने "आधुनिक कॉन्टॅम युग" या विषयावर वैज्ञानिक माहिती अत्यंत विस्...

शास्ञीनगर विभागाच्यावतीने आमदार अतुलबाबा भोसले यांचा जाहिर सत्कार.

Image
  शास्ञीनगर विभागाच्यावतीने आमदार अतुलबाबा भोसले यांचा जाहिर सत्कार. राष्ट्रीय महामार्ग क्र ४८ वरिल शास्ञीनगर विभागाला उड्डानपूलाखालून क्राॅसिंगला मंजूरी. तानाजी देशमुख यांच्या पाठपुराव्याला अतुलबाबांचे पाठबळ. अंतर्गत रस्ता व गटरसाठी २५ लाख रु निधीची घोषणा. कराड - प्रतिनिधी. कराड तालुक्यातील मलकापूर शहरातील शास्ञीनगर विभागातील महामार्गाच्या पूर्व व पस्चिम विभागासाठी पिलर क्र ७५ ते ७६ दरम्यान कायमस्वरुपी रस्ता क्राॅसिंग मंजूर झाल्याबध्दल आमदार अतुलबाबा भोसले यांचा शास्ञीनगर विभागाच्यावतीने भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला याप्रसंगी परिसरातील नागरिक बहुसंख्ये उपस्थित होते. यावेळी मलकापूर नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते हणमंतरावजी जाधव, सुरज शेवाळे, विजय देशमुख,शकिल मोमीन,शंकर सोनवले, औदूंबर सुरवसे,तुकाराम मगदूम यांची प्रमुख उपस्थिती होती.  यावेळी बोलताना आमदार अतुलबाबा भोसले म्हणाले कि या विभागातील नागरिक, विद्यार्थी,व्यावसायिकांची   क्राॅसिंगच्या मागणीची दखल घेत येथील सामाजिक कार्यकर्ते तानाजी देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये ७ फेब्रुवारी २०२५ रोजी मला नागरिकांच्यावत...

संविधानाने दिलेल्या समतेचा समाज घडविण्यासाठी समता सैनिक दल काम करणार.

Image
  संविधानाने दिलेल्या समतेचा समाज घडविण्यासाठी समता सैनिक दल काम करणार.  _____ॲड. एस. के. भंडारे सांगली - प्रतिनिधी. भारतीय संविधानातील  अनुच्छेद 14  ते 18नुसार , कायद्यापुढे सर्व समान समान , धर्म, वंश, जात किंवा लिंग, जन्म स्थान या वरून भेदभाव करण्यास मनाई व सार्वजनिक जागा वापरण्यास कोणतेही बंधन घालता येणार नाही, नोकरी साठी समान संधी देणे मात्र मागासवर्गीयांसाठी विशेष तरतूद करता येते.अस्पृश्यता नष्ट केली असून कोणीही अस्पृश्यता लादणे किंवा बाळगली तर त्याच्या विरुद्ध  ऍट्रॉसीटी कायद्यानुसार गुन्हा होतो इत्यादी समानतेच्या तरतुदी केल्या आहेत.    अनुच्छेद 19ते 22 नुसार , भाषण व आपले मत लिखाणातून सुद्धा व्यक्त करणे, शांततेने व विना शस्त्र एकत्र येणे संस्था स्थापन करणे, देशात सर्वत्र संचार करणे, राहणे व स्थायिक होणे आणि  कोठेही व्यवसाय, व्यापार, धंदा व नोकरी करणे तसेच स्वतः विरुद्ध साक्ष देण्याची सक्ती केली जाणार नाही, एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा जास्तवेळा शिक्षा दिली जाणार नाही, व्यक्तीचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य कायद्यात सांगितलेल्या पद्धती श...

कोल्हापूरात तृतीयपंथीयांसाठी होणार स्वतंत्र समुपदेशन केंद्र; जिल्हास्तरीय बैठकीत धोरण अंमलबजावणीवर चर्चा

Image
  कोल्हापूरात तृतीयपंथीयांसाठी होणार स्वतंत्र समुपदेशन केंद्र; जिल्हास्तरीय बैठकीत धोरण अंमलबजावणीवर चर्चा कोल्हापूर, दि. 04 : तृतीयपंथीयांना सामाजिक बहिष्कार, भेदभाव आणि कौटुंबिक नकार यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते, ज्यामुळे त्यांच्यात मानसिक तणाव, नैराश्य आणि चिंता वाढते. यावर उपाय म्हणून छत्रपती प्रमिलाराजे जिल्हा रुग्णालयाच्या आवारात अस्तित्वात असलेल्या सर्वसामान्यांसाठीच्या समुपदेश केंद्र आवारात तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र समुपदेशन केंद्र सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले. हे केंद्र तृतीयपंथीयांना भेदभावमुक्त वातावरणात मुक्तपणे व्यक्त होण्यासाठी सुरक्षित जागा तयार करेल आणि विशेष प्रशिक्षित समुपदेशकांमार्फत त्यांना मानसिक, सामाजिक तसेच व्यावसायिकदृष्ट्या सक्षम बनवेल. जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शाहूजी सभागृहात तृतीयपंथी कल्याण व हक्कांचे संरक्षण समितीच्या बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. या बैठकीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरज कुमार, सहायक आयुक्त समाज कल्याण सचिन साळे, सहायक आयुक्त कौशल्य विकास जमीर करीम...