सीमा सुरक्षा दलातील जवान नानाश्री भगवान माने यांच्यावर शासकीय इतमामात अत्यसंस्कार

 सीमा सुरक्षा दलातील जवान नानाश्री भगवान माने यांच्यावर शासकीय इतमामात अत्यसंस्कार .


  शिराळा -  प्रतिनिधी   (आनंदा सुतार)

पुनवत ता शिराळा येथील सीमा सुरक्षा दलातील जवान नानाश्री भगवान माने (आंदळकर)यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले . सांगली मुख्यालयातील पोलीस पथक व पुण्यातील बिएसएफ जवानांच्या पथकाने बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना अखेरीची मानवंदना दिली.

   यावेळी तहसीलदार गणेश शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक.विशाल पाटील, भाजप नेते सत्यजित देशमुख, जि.प.सदस्य संपतराव देशमुख , प.स.सदस्या मनीषा गुरव, सीमा सुरक्षा दलाचे महेश सिंग, अजय पाटील,सरपंच वंदना शेळके, उपसरपंच गणपती शेळके, ग्रामसेविका तेजश्री आतकीरे, तलाठी सुजाता वंजारी, पोलीस पाटील बाबासाहेब वरेकर, अमरसिंह आंदळकर, दत्तात्रय आंदळकर,  बाळासाहेब तांबे  यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. 

जवान नानाश्री माने यांचे सोमवारी आगरतळा येथे प्रकृती अस्वास्थ्यामुळे निधन झाले होते . चार दिवसांनी त्यांचे पार्थिव पुनवत गावी आणण्यात आले .सकाळी आठच्या सुमारास त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढून गावच्या माळावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले .तालुका प्रशासण तसेच सीमा सुरक्षा दलाच्या वतीने पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली .

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .