सर्व विक्रेत्यांना दुकान परवाना तसेच खाद्य पदार्थ विक्री करणार्या विक्रेत्यांना खाद्यपदार्थ विक्री परवाना आवश्यक .
सर्व विक्रेत्यांना दुकान परवाना तसेच खाद्य पदार्थ विक्री करणार्या विक्रेत्यांना खाद्यपदार्थ विक्री परवाना आवश्यक .
ब्यूरो रीपोर्ट - गोंडवाना न्य़ूज.
कोणत्याही पदार्थाच्या विक्रीसाठी, संबंधित विक्रेत्यास विक्रीबाबत परवाना घेणे सक्तीचे असून यात भाजीपाला, कांदा बटाटा विक्रेते तसेच पान टपरीधारकांचाही समावेश आहे. याबाबत विक्रेत्यांमध्ये अद्यापही उदासीनता तर स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येत आहे.
कराड तालुक्यातील ओंड , उंडाळे परिसरात हातगाडीवर खाद्य पदार्थ विक्री करणारे असो अथवा मोठ्या दुकानांवरील विक्रेते किंवा हॉटेल असो, या सर्वांना खाद्य पदार्थ विक्रीसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून परवाना घ्यावा लागतो , मात्र परवाना चे प्रमाण अत्यंत अल्प स्वरुपात दिसुन येत असुन नागरीकांना विक्री करण्यात येणार्या खाद्यपदार्थाची गुणवत्ता व शुद्धता याबाबत कोणतीही मानके पाळली जात नाहीत.
किराणा मालाचे विक्रेते, मांस,मासे, अंडी विक्रेते, पान टपरी, बेकरी,भाजीपाला विक्रेते या सर्व घटकांनी नोंदणी किंवा परवाना घेणे बंधनकारक करण्यात आले असुन ही स्थानिक प्रशासन व अन्न व औषध प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ओंड , उंडाळे परिसरातील कांदा बटाटा, भाजीपाला विक्रेते विना परवाना व्यवसायासह सर्वसामान्य ग्राहकांची उघड-उघड फसवणूक करुन जादा दराने विक्री करताहेत.
ग्रामीण परिसर असो अथवा शहर कोठेही एका कोप-यात टपरी, हातगाडी लावून खाद्यपदार्थ अथवा कांदा बटाटा,भाजीपाला विक्री सुरू केली तरी सहसा परवाना घेतला जात नाही. खाद्यपदार्थ थेट मानवी शरीरात जात असल्याने ते विक्री होत असलेल्या ठिकाणी अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार नियमांचे पालन (स्वच्छता असो वा इतर नियम) होत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे मानवी आरोग्याच्या दृष्टीने या सर्व विक्रेत्यांना ही नोंदणी व परवाना सक्तीचे करण्यात आले असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने सांगण्यात आले , मात्र व्यापाराकडुन याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष तर अन्न व औषध प्रशासनाकडुन कायदेशीर कारवाईस दिरंगाई होत आहे. १२ लाखावर उलाढाल असल्यास परवाना सक्तीचा ज्या व्यावसायिकांची वर्षाअखेर १२ लाखांच्या वर उलाढाल आहे त्यांना परवाना घेणे बंधनकारक आहे तर ज्यांची उलाढाल १२ लाखाच्या आत आहे त्यांना नोंदणी करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. तसे न केल्यास विक्रेत्यांविरोधात न्यायालयात खटले दाखल करण्याची तरतूद कायद्यायात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने देण्यात आली.घाऊन विक्रेते, उत्पादकही कारवाईस पात्र ज्या किरकोळ विक्रेत्यांकडे खाद्य पदार्थ विक्रीचा परवाना नसेल त्यांना जर उत्पादक अथवा घाऊन विक्रेते माल पुरवीत असतील तर त्या घाऊक, अर्ध घाऊक तसेच उत्पादकांवर अन्न व सुरक्षा मानके कायद्याअंतर्गत (परवाना अट १४ कलम अंतर्गत) संबंधित विक्रेते कारवाईस पात्र ठरतील, असे अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने सांगण्यात आले. एखाद्या दूध विक्रेत्यास परवाना अथवा नोंदणी नसल्यास दूध कंपनीने दूध पुरविले तर त्या कंपनीवरदेखील कारवाई होऊ शकते, असे स्पष्ट करण्यात आले.
अन्न व औषध प्रशासनाने किरकोळ व्यापारी, भाजीपाला, कांदा बटाटा व इतर व्यवसायिकांना आपल्या व्यवसायासाठी लागणारे परवाना काढुन घेण्याचे वेळोवेळी आवाहन करुन ही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात असल्याने संबंधित प्रशासने कायदा वापर करत कारवाई करण्याची मागणी ग्राहकामधुन होत आहे.विना परवाना व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांमुळे अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होऊन विकासात्मक परिस्थितीला बाधा निर्माण होते यामुळे या गोष्टींच्या कडे गांभीर्यानं संबधित प्रशासनानं बघून त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी ग्राहकांतून होत आहे.
वजन काटे निरिक्षण करण्याची नितांत गरज.
कांदा बटाटा, भाजीपाला व्यवसायिक सध्या ओंड, उंडाळे परिसरात काही बडे व्यापारी होलसेल व रिटेल व्यवसायात अग्रेसर असुन त्यांच्या वजन काटाची वेळोवेळी चाचणी करुन ग्राहकाच्या खिशाला लागणारी कात्री संबंधित प्रशासनाने वेळीच कारवाई करुन कायदेशीर वचक बसवण्याची गरज निर्माण झाली असल्याचे सर्वसामान्यातुन प्रतिक्रीया व्यक्त होत आहेत.

Comments
Post a Comment