उंडाळे येथील महावितरण विभागाच्या कार्यालयास बळीराजा शेतकरी संघटना, शेतकरी यांच्यातर्फे वीजबील माफीसाठी निवेदन.
उंडाळे येथील महावितरण विभागाच्या कार्यालयास बळीराजा शेतकरी संघटना, शेतकरी यांच्यातर्फे वीजबील माफीसाठी निवेदन.
उंडाळे- प्रतिनिधी.
उंडाळे येथील महावितरण विभागाच्या कार्यालयास बळीराजा शेतकरी संघटना, शेतकरी यांच्या माध्यमातून घरगुती, शेती पंपाच्या विज बिले माफ करण्यासाठी निवेदन देण्यात आले.
उंडाळे परिसरातील गेल्या तीन वर्षामध्ये अतिवृष्टी व गेल्या वर्षभरापासुन कोरोना संकटामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या पुर्णपणे उध्दवस्त झाला असुन, आज शेतक-याला शेतीसाठी सरकारकडुन अर्थिक मदतीची गरज असताना.सरकार व महावितरण विभागाचे कर्मचाऱ्यांकडुन शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यास भाग पाडत असुन शेतकऱ्यांची घरगुती व शेती पंपाची विज बिले भरण्यासाठी सक्ती केली जात असत कोणतेही कनेक्शन न तोडता विज बिल पुर्णपणे माफ करण्यात यावीत. तसेच उंडाळे सबडिव्हीजन मधील शेती पंपाची विज बिले रिडींग प्रमाणे देण्यात यावी , येळगाव शेती फिडर MERC फिडर जाहिर करण्यात आला असुन तो पुर्वरत करण्यात यावा.अन्यथा बळीराजा शेतकरी संघटना , स्थानिक शेतक-यांकडुन तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन देण्यात आले.
यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे राष्टिय अध्यक्ष पंजाबराव पाटिल, उदय पाटिल उंडाळकर, धनाजी पाटिल, मिलिंद पाटिल, सागर जाधव , धनाजी देशमुख,आबासो शेंडगे, व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

Comments
Post a Comment